Friday, October 28, 2016

आम्ही पुन्हा एकदा जन्माला येऊ.......

महाराष्ट्राची भुमी ही अनेक रक्तरंजित ईतिहासाची साक्षीदार आहे. त्यापैकीच एक चारशे वर्षापुर्वीचा ईतिहास माँसाहेब जिजाऊ या वाघीणीणे जन्माला घातलेले वादळ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज या वादळाचे नुसते नाव जरी घेतले. तरी काय होते हे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत खिंड लढणार्‍या बाजीप्रभू देशपांडे यांना विचारा. पिसाळलेल्या हत्तीला निशस्त्र ठार करणार्‍या (मला नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येतोय) येसाजी कंक यांना विचारा. आणखी विचारायचेच असेल तर त्या फक्त सात मावळ्यांना विचारा ज्यांनी साडेतीन हजार शत्रूचा एका दमात खात्मा केला. घेऊ आम्ही पुन्हा एकदा जन्म पण त्यासाठी अगोदर आमच्या मातोश्री जिजाऊना जन्म घ्यावा लागेल. पण आज त्याच सुरक्षित नाहीत तर मग आम्ही तरी कसे जन्माला येऊ. आजकालची पोरं जिममधे जाऊन नुसतेच दंड फुगवतायत आणि कमजोर घटकावर मर्दुमकी गाजवतायत पण ज्या वेळी आमच्या माँसाहेबवर अत्याचार झाले त्यावेळी कुठे गेली होती ही मर्दुमकी. ..? बर या सगळ्यातून जरी आम्ही जन्म घेतला तरी आमचे बाजीप्रभू, येसाजी, संताजी, जिवा महाले, आणि स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारी आमची रयत भेटेल का हो.

- ज्ञानेश्वर सुनिता संभाजी शिंदे

व्यथा

नका करू माझी कुचेष्टा
नका काढू मोर्चा
नका टाकू मला जातीच्या दलदलीत
न्यायासाठी झगडतेय मी
तो मिळत नाही कोणत्याच न्यायालयात
तुम्ही तरी द्याल का हो न्याय मला
ही नाही माझ्या एकटीचीच व्यथा
वाटले होते
आयुष्य खुप सुंदर आहे
खुप शिकायच होतं
मोठ्या हुद्द्यावर जायचं होत
आता कुठे जगायला शिकले होते.
पण कुठे चुकले मी हेच उमजेना
आता येतोय याच आयुष्याचा किळस
सगळीकडे वावरतायत पिसाळलेले लांडगे
मी तर चालले.....
परत कधीच न येण्यासाठी
पण माझ्या
मायची आणि तायची कोण करील राखण
तुम्ही तरी कराल का माझी शेवटची ईच्छा पुरी नाहीतर पुन्हा एकदा घडेल निर्भया आणि कोपर्डी

Tuesday, October 25, 2016

आयुष्य

आयुष्य
हे एकदाच मिळते.
तेव्हा
ते चांगल्याच पध्दतीने जगायच असतं
करोडो रुपयांच्या शरीराची ₹10 च्या तंबाखू , गुटखा खाऊन वाट लावू नका
आणि जमल्यास आई बाबाचे आभार माना

Tuesday, October 4, 2016

राजे तुम्हीच होता का आमचे पुर्वज....?

"छत्रपती शिवाजी महाराज" एक क्रांतीसुर्य जो गेली चार शतके त्याच प्रखरतेने तळपतो आहे.
शिवाजी महाराज हे एक असे व्यक्तीमत्व आहे. जसे एका हिर्‍याला अनेक पैलू असतात अगदी
त्याचप्रमाणे शिवरायांचे अनेक पैलू आहेत.
● एक राजा म्हणून त्यांनी आपल्या रयतेला पोटच्या मुलाप्रमाणे जपले.
● एक न्यायाधीश म्हणून योग्य न्याय करून गुन्हेगारांना दंड दिला.
● एक राजकारणी म्हणून कुटनीती वापरून शत्रूला नामोहरम केले.
● एक इंजिनिअर म्हणून रायगडासारखी राजधानी आणि सिंधुदुर्ग सारखी जगविख्यात वास्तु उभारल्या
● एक अर्थतज्ज्ञ ज्याच्या संपूर्ण हयातीत स्वराज्यात कधी आर्थिक मंदी आली नाही.
● एक यौद्धा म्हणून ( स्वराज्य  ) साम्राज्य उभे केले.
● समुद्रात आरमार उभे करणारा पहिला आणि एकमेव राजा
● एक पुत्र ज्यांनी पर स्त्री ला माते समान मानले.
● एक पिता ज्यांनी संभाजी राजासारख्या छाव्याला जन्म दिला.
       किती किती म्हणून महाराजांचे पैलू सांगू .
आज चारशे वर्षे झाली तरी आपल्याला महाराजांची गरज पडते.
       आहो महाराजांनी त्यांचा एक एक मावळा असा तयार केला होता की त्यांच्या गैरहजेरीत ही तो शत्रूला नेस्तनाबूत करत होता.
   आम्ही काय बांगड्या भरल्यात का बांगड्या ?
हो... भरल्यात बांगड्या म्हणून तर कोपर्डीसारखी मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आणि अशा असंख्य घटना घडतायत.
आणि आम्ही नुसतेच कँडल मार्च काढतोय, मुक मोर्चा काढतोय आणि काहीजण नुसतीच बघ्यांची भुमिका साकारतायत .
हे सर्व होत असताना.
छत्रपती शिवरायांना ही प्रश्न पडला असेल.
" याच मातीत मी जन्म घेतला होता का ?
आणि हेच आपले वारसदार का " ?
   ज्यांचा हातात काकणं होती. त्यांनी ही काकणं उतरवून हतात समशेरी घेऊन शत्रूला कापले होते हे विसरु नका.
आणि ती जर वेळ पुन्हा आली तर या भुतलावरुन पुरुषार्थाचा नायनाट होईल.
आमच्यात पुरुषार्थ आता फक्त नावाला उरलाय म्हणूनतर आम्ही फक्त निषेध करण्यात धन्यता मानतोय.
            बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, जिवा महाले, संताजी घोरपडे,
आणि आपल्या वेडापायी दवडलेले ते सात वीर अशा असंख्य ज्ञात अज्ञात महापुरुषांनी याच महाराष्ट्रासाठी स्वतःच्या रक्ताचे पाट वाहीलेत.
        का..........?
त्यांना वेड लागले होते म्हणून. ..?
हो.....
लागले होते त्यांना वेड त्यांना वेड लागले होते स्वराज्याचे त्यांना वेड लागले होते स्वातंत्र्याचे.
आणि आज त्याच महापुरुषांची आम्ही जातीनिहाय  वाटणीच करून टाकली आहे.
याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणतीच असू शकत नाही
आजचे काही राजकीय पक्ष हे स्वतःच्या स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे भांडवल करतायत आणि आम्ही मुकाट पणे सहन करून यात अडकत चाललोय.
        जपान हा देश जगाच्या नकाशावर जरी अगदी छोटा वाटत असला तरी त्यांच्याकडे ज्याप्रकारची जिद्द आहे ती जगातील कोणत्याच देशाकडे नाही .
म्हणून तर हिरोशिमा, नागासाकी वर कोसळलेली मानवनिर्मित आपत्ती असो किंवा भुकंप , सुनामी सारखी नैसर्गिक आपत्ती असो.
या सगळ्यातून जपान अगदी फिनिक्स पक्षासारखी पुन्हा पुन्हा भरारी घेत आहे.
         अशीच जिद्द आणि चिकाटी होती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांकडे.
         आज आपल्यातील कष्ट करण्याची जिद्द संपली की आपण लगेच अंधश्रद्धा, जादूटोणा यांच्यावर विश्वास ठेवतो.
असाच विश्वास स्वतःवर कधी ठेवलाय का...?
छत्रपती शिवरायांना स्वतःवर विश्वास होता म्हणून तर त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्या सोबत ओठांवर मिसरूड फुटायच्या आधीच स्वराज्याचा संकल्प केला होता.
आणि तो पुर्ण करण्यासाठी मरेपर्यंत कष्ट घेतले.
मग आमच काय ?
आम्ही आजपर्यंत किती संकल्प केलेत हो.
आणि किती पुर्ण केलेत.
           नुसताच शिवरायांचा फोटो छाताडावर लावून बोंबलत फिरण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा प्रचार करा.
तेवढे जरी होत नसेल तर किमान स्वतः तरी त्यांच्या  विचारांचे पाईक व्हा.
एवढ जरी केले तरी भरपूर झाले.
          अजुन एक आपल्या देशात पेव फुटले आहे.
ते म्हणजे "जात" मी अमुक जातीचा तु तमुक जातीचा
मला एक सांगा,
आम्ही जातीसाठी एकमेकांची डोकी फोडतोय. आणि
तिकडे सिमेवरती जवान आपल्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटत आहेत.
             आपल्या सगळ्यांचा गरजा सारख्याच ना तोंडानेच खातो आणि बुडानेच सोडतो ना.
का आणखी काही वेगळे करतो.
मग कशापायी आपण आपापसांत भांडतो.
एक लक्षात ठेवा जोपर्यंत आपण आपापसात भांडत बसू त्या त्या वेळी असेच आतंकवादी हल्ले होत राहतील. ते म्हणतात ना
"दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ"
          बघा विचार करा ही वेळ तुमच्यावर ही येवू शकते.

जय हिंद
जय महाराष्ट्र

                             स्वतंत्र भारताचा एक नागरिक
                                -  ज्ञानेश्वर संभाजी शिंदे

Tuesday, September 27, 2016

नैसर्गिक शेती काळाची गरज

विनाशकाले विपरीत बुद्धी!

अॅड. गिरीश राऊत 

पृथ्वीवर किती धान्य पिकवू शकतो किंवा किती गोडे पाणी वापरू शकतो याला नैसगिर्क मर्यादा आहेत. 'मार्केट सरप्लस'ची कल्पना सोडून 'भुकेसाठी अन्न' (फूड सरप्लस) ही संकल्पना रुजली पाहिजे. या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्राला सवतीची वागणूक देणे घातक आहे. उद्योगांचा उदो उदो करून, शेती यापुढे कशी न्याय देऊ शकणार नाही, याचे चित्र रंगविले जात आहे. ही 'विनाशकाले विपरीत बुद्धी' आहे. 

................ 

जगाला केवळ सहा आठवडे पुरेल एवढाच अन्नाचा साठा शिल्लक असल्याचे यूनोने स्पष्ट केले आहे. खाद्यान्नाचे उत्पादन घटण्यास मोठे कारण 'जागतिक तापमान वाढ' हे आहे. तृणधान्य, कडधान्य आणि भाजीपाला व कंद तसेच सर्वच वनस्पतींच्या सर्जनाचा, फलनाचा व वाढीचा तापमानाशी थेट संबंध आहे. घटणाऱ्या भूजलामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. 

औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे नैसगिर्क अधिवासांचा नाश झाला आणि जैविक विविधता संपुष्टात आली. किटक व इतर परागीभवनास मदत करणाऱ्या जिवांच्या नाशामुळे फलधारणा घटत गेली. ४० वर्षांपूवीर् हरित क्रांतीचा प्रयोग झाल्यानंतरच्या काळात जैव तंत्रज्ञानाकडे वळावे लागले. हे हरित क्रांती अयशस्वी झाल्याचे निदर्शक होते. त्यानंतर जनुक तंत्रज्ञानाकडे धाव घेणे हे जैव तंत्रज्ञानाचे अपयश अधोरेखित करते. आता भात, गहू, बार्ली, मका इ. उत्पादनासाठी नैसर्गिक तृण जातींऐवजी बदल केलेल्या वृक्ष जातींच्या स्वरूपाचा वापर करावा, अशा दिशेने तथाकथित आधुनिक तंत्रज्ञानाचे समर्थक जात आहेत. या समर्थकांना यातील धोके व फोलपणा विज्ञानाचे ख-या अर्थाने आकलन झालेले नसल्याने लक्षात येत नाही. 

किटकनाशकांच्या वापरात व विषाच्या तीव्रतेत १० पट वाढ होऊनही पूर्वीच्या तुलनेत दुप्पट पीक गमावले जात आहे. कृषीउद्योग व सरकारांच्या एकत्रित दबावामुळे जगभर पिकांच्या स्थानिक जाती हटविल्या गेल्या. कीड व वाईट हवामानाला तोंड देण्याची त्यांची क्षमता हरित क्रांतीने आणलेल्या औद्योगिक जातींपेक्षा जास्त होती. त्या जनुकीयदृष्ट्या जास्त सक्षम होत्या. या स्थानिक जाती सतत उत्क्रांत होत स्वत:मध्ये नव्या क्षमता निर्माण करीत होत्या. औद्योगिक युगात प्रयोगशाळेतील जातींना किडींपासून वाचविण्यासाठी संकर घडविणाऱ्यास सतत स्थानिक मातीतील जातींच्या जनुकीय शहाणपणावर प्रत्यक्षपणे अथवा बीज बँकांतफेर् अवलंबून राहावे लागते; परंतु आंधळ्या औद्योगिक युगात स्थानिक जाती झपाट्याने गमावल्या गेल्याने प्रयोगशाळेतून आलेल्या जातींना लांबच्या पल्ल्याच्या स्पधेर्त किडींच्या एक पाऊल पुढे राहणे, वर्चस्व ठेवणे अशक्य झाले. त्यातच रासायनिक माऱ्याने व नजीकच्या जंगलांच्या ऱ्हासामुळे किडींचे नैसगिर्क भक्षक नष्ट झाले. 

मॉनसॅटोसारख्या महाकाय कंपन्यांनी तणरहित व नांगर-रहित शेतीचा दावा करणे हा तर विनोदी प्रकार होता. आधी या कंपनीची 'राऊंडअप'सारखी जहाल तणनाशके वापरायची, नंतर त्यांचा पिकांवरही वाईट परिणाम होतो. म्हणून त्यांना तोंड देणारी बियाणी याच कंपन्यांनी आणली. शेतक-यांनी दोन्ही कृत्रिम गोष्ट विकत घ्यावयाच्या. याचा अंतिम परिणाम जमीन मृत होण्यात होतो. या सर्व खटाटोपापेक्षा गांडुळे व जिवाणूयुक्त जमीन राखल्यास त्याचे शाश्वत स्वरूपात अनेक फायदे होते. राख व मशागत करून विशिष्ट वेळी प्रमाणात पाणी परंपरागत पद्धतीने साचवून तणांना रोखता येत होते; परंतु मग या बड्या कंपन्या कशा चालणार? 

युरोपातील सुमारे ८५ टक्के जमीन ही शेतीतील रसायनांच्या माऱ्यापासून ते 'आम्लयुक्त पाऊस' अशा औद्योगिकीकरणाने जन्म दिलेल्या अनेक कारणांमुळे 'नि:सत्व व विषारी' बनली आहे. तापमानवाढीमुळे खनिज इंधनांविरुद्ध जनमत तयार होऊ लागले. हे इंधनही नजीकच्या भविष्यात संपणार आहे, म्हणूनही कदाचित असेल, पण वनस्पतीजन्य तेल मिळविण्याची टूम काढली गेली आहे. 'जेट्रोफा'सारख्या वनस्पती तेलामुळे हरितगृह परिणाम करणारे वायू तयार होतच राहतील, उलट शेतीखालील क्षेत्र लागवडीखाली आणल्याने अन्नाचे उत्पादन मात्र मोठ्या प्रमाणावर घटेल यात शंका नाही. 

कृषी विद्यापीठांनादेखील याबाबत मूलभूत विचार करून भारतीय परंपरागत शेतीची ताकद समजावून घ्यावी, असे वाटत नाही. ५० वर्षांपूवीर्पर्यंत केवळ भारतातच पिढ्यान्पिढ्यांच्या अनुभवजन्य प्रयोगशील शहाणपणातून शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतांमध्ये विकसित केलेल्या भाताच्या सुमारे दोन लाख जाती होत्या. मातीचा पोत, उपलब्ध पाणी व इतर घटकांचा विचार करून खाचरागणिक वेगळ्या जाती लावण्यात येत, हे आजही जुना शेतकरी सांगेल; परंतु आधुनिकतेच्या नावाखाली ही अमूल्य जैविक विविधता नष्ट केली गेली. त्याऐवजी प्रयोगशाळांनी पुरस्कृत केलेल्या निवडक जाती लादल्या गेल्या. संशोधनाबाबतही चुकीचे दावे केले जातात. उदा. खारफुटीच्या जनुकांचा वापर करून जनुकीय तंत्रज्ञानातफेर् भरतीच्या खाऱ्या पाण्याच्या क्षेत्रात जगणाऱ्या भाताच्या जाती तयार करण्याच्या बढाया मारल्या जातात. परंतु ठिकठिकाणी

अगदी कोकणात, ठाणे जिल्ह्याच्या किनाऱ्यावर शेकडो वर्षांपासून 'कोळपी' ही भाताची जात लावली जातच होती. स्थानिक जातींची नाळ पर्यावरणाशी जोडलेली होती. जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींची सार्वत्रिक शिफारस दूरगामी विचार करता चुकीची होती. 

पावसाचे आदिम काळापासूनच अचूक वेळापत्रक मोडलेले या पिढीच्या काळात आपण पाहिले. अतितीव्र उन्हाळा आणि हिवाळा आपण अनुभवतो. भर उन्हाळ्यात हिमवर्षाव व गारपिटी होत आहेत. सातत्याने अवर्षण आणि अतिवृष्टीचा खेळ आपण पाहत आहोत. अन्नोत्पादन व इतरदृष्ट्या ही धोक्याची घंटा राहिली नसून, प्रत्यक्ष आपत्ती सुरू झाली आहे. 

या प्रश्नाचे दुसरे महत्त्वाचे अंग म्हणजे जागतिकीकरणाच्या नावे सार्वजनिक वितरण व्यवस्था मोडली गेली. बाजारच परिस्थिती नियंत्रित करील, असे म्हणून सरकारने आपली जबाबदारी झटकली. ही स्थिती काही जागतिक कंपन्यांना उपयुक्त होती. आज बहुतेक देशांच्या अन्नसाठ्यांवरच नव्हे, तर उत्पादन पद्धतीवरही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढ्या महाकाय कंपन्यांचे नियंत्रण आहे. पर्यायाने मानवी जीवनावरच नियंत्रण आहे. त्याच देशांची आयात-निर्यात धोरणे व निर्णय ठरवित आहेत. त्यामुळे सरासरीने सर्वाधिक उष्मांकयुक्त अन्न सेवन करणाऱ्या अमेरिकेतही एक कोटी २० लाख गरीब कुटुंबांना पुढील जेवणाची चिंता भेडसावत आहे. 

एकप्रकारे इतर ऊर्जाप्रमाणेच अन्न ही उर्जाही अधिकाधिक निर्माण करण्यावर भर दिला गेला. पण प्रश्न दोन्हीकडे सारखाच आहे. ही ऊर्जा कोणासाठी होती? दुसरे असे की, शाश्वत स्वरूपात ही ऊर्जावाढ शक्य आहे काय? नफ्याचाच विचार करून अर्थव्यवस्थेचे वारू उधळणाऱ्यांना वाढीला मर्यादा नाही असे वाटते; परंतु पृथ्वीवर किती धान्य पिकवू शकतो किंवा किती गोडे पाणी वापरू शकतो याला नैसगिर्क मर्यादा आहेत. 'माकेर्ट सरप्लस'ची कल्पना सोडून 'भुकेसाठी अन्न' (फूड सरप्लस) ही संकल्पना रुजली पाहिजे. 

या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्राला सवतीची वागणूक देणे घातक आहे. उद्योगांचा उदो उदो करून, शेती यापुढे कशी न्याय देऊ शकणार नाही, याचे चित्र रंगविले जात आहे. ही 'विनाशकाले विपरीत बुद्धी' आहे. शेतीचे म्हणवले जाणारे अपयश आधुनिक शेतीच्या संदर्भात आहे आणि ते खरे तर औद्योगिकीकरणाचे अपयश आहे. शेती ही नैसगिर्क व जैविक घडामोड उरलीच नव्हती. शेतीच्या रूपात उद्योगच काम करीत होते. परंपरागत शेतीने भटक्या अवस्थेनंतर सुमारे दहा हजार वषेर् मानवाला पर्यावरणस्नेही स्थिर जीवन दिले होते. आताच्या भीषण समस्या व अनिश्चितता अल्पकालीन औद्योगिकीकरणाने निर्माण केल्या आहेत. जर उरलेली शेती मोडली, तर मानवजात काय खाणार आहे? आफ्रिकेतील रस्त्यांवर सुरू झालेले दंगे उद्या जगभर होणार आहेत. आपला देशही अपवाद नसणार.